पंढरपूर // प्रतिनिधी
तिरंग्याचा मास्क विकत घ्याल तर जेलमध्ये जाल असे मास्क विक्री करणार्या इशारा यांनी दिला आहे.15ऑगस्ट निमित्त बाजारामध्ये तिरंग्याचे मास्क विक्रीसाठी आले आहेत. हा मास्क.नव्हे स्वाभिमानी भारताचा तिरंगा आहे.तो भारतीयांचा अभिमान व स्वाभिमान आहे या राष्ट्रीय स्वाभिमानाला ठेच पोहोचण्याचे काम जर कोणी हे केले तर कठोर कारवाई करण्यात येईल.त्यांनी विक्री केले अथवा घेणाऱ्यांनी जर मास्क घेतले असे निदर्शनात आल्यास हे खपवून घेतले जाणार नाही.तिरंगा म्हणजे देशाची व महाराष्ट्राची आन-बान शान आहे. भारतीय तिरंग्यासाठी आज सीमेवर जवान आपला प्राण देतोय आणि तिरंग्याचे मास्क बनवून मनोविकृतीचे लोक विकत आहे. हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. सुजान नागरिकांनी मास्क खरेदी विक्री करू नये.आणि तो घालू नये तिरंग्याचा अपमान करू नये.त्या माफ कर शिंका,थुंकी लागणार आणि तो मास्क नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरापेटीत फेकून ही बाब गंभीर आहे.तिरंग्याचा अपमान करून फेकून देणार असे मास्क घालून राष्ट्रध्वजाचा अपमान करू नका.अन्यथा तोंडाला काळे फासून गाढवावर बसून धिंड काढण्यात येईल.असा इशारा शिवस्वराज्य युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपराजे मुटकुळे यांनी दिला.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.