पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर मध्ये पायी दिंडी न काढता सरकारला सहकार्य करूनही पंढरपूर शहर पोलीस स्टेशन मध्ये मराठा बांधवावर गुन्हे दाखल केले आहेत.
शांततेत आमच्या मागण्या सरकार कडे करत असताना अशा पध्दतीने दाखल गुन्ह्याचा निषेध करतो.जर मराठा बांधवावरील गुन्हे मागे घेतले नाही तर मराठा समाज राज्यभरात रस्त्यावर उतरेल,रास्ता रोको,चक्का जाम करेल,तसेच मंत्र्याना सुध्दा अडवले जाईल.महाविकास आघाडी सरकारने न्यायाल्यातील आरक्षण्यावरची स्थकीती उठवून मराठा समाजला न्याय द्यावा.सारथील निधी आजून देण्यात यावा. महाराष्ट्रातील सर्व जिल्हातील व तालुक्यातील मुलीचे वसतिगृह उभे करावे.42मराठा बांधवांना परतकी 10लाख रू देण्यात यावे व नोकरी मध्ये घेण्यात यावे.अशा अनेक मागण्या मान्य करून महाविकास आघाडी सरकारने न्याय द्यावा.
या सर्व मागण्याची दखल घेतली नाहीतर सकल मराठा समाज पुन्हा जनआक्रोश आंदोलन करणार असा ईशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी दिला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.