पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपुरातील कुंभार घाट दुर्घटनेतील मयत अभंगराव कुटुंबियांचा पाच लाख रूपयाचा विमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तसेच शाडो सहकार मंत्री मा. दिलीप(बापू) धोत्रे यांच्या वतीने काढण्यात आला आहे.
गेल्या दिड महिन्यांपूर्वी पंढरपूरातील कुंभार घाट येथील भिंत कोसळी यादुर्घटनेत अभंगराव काही व्यक्ती मयत झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेळोवेळी आडेअडचणींना धावत येत असून आज अभंगराव कुटुंबातील वारसांना विम्याचे संरक्षण (सर्टिफिकेट) मा. दिलीप(बापू) धोत्रे यांनी देऊन या कुटुंबाला मोठा आधार दिला आहे.
यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, उपाध्यक्ष महेश पवार, विभाग अध्यक्ष नागेश इंगोले, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष प्रताप भोसले, सामाजिक कार्यकर्ते गणेश पिंपळणेरकर व आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.