सोलापूर, दि. 23 : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी व रात्री संचारबंदी लागू केली आहे.
यामुळे जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजनेतील 55 हजार 6 शिधापत्रिकाधारकांना प्रती शिधापत्रिका गहू 25 किलो आणि 10 किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंबामधील 17 लाख 47 हजार 63 लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मे 2021मध्ये मोफत देणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल कारंडे यांनी कळविले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.