उजनीचं एक थेंब पाणी न जावुन देण्यासाठी जलसमाधी घेणार.




उजनी पाणी बचाव संघर्ष समिती ची स्थापना


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी उजनी धरणातील पाच टीएमसी.पाणी इंदापुर तालुक्यात नेले असुन तो बेकायदेशीर निर्णय माघारी घ्यावा यासाठी जनअंदोलन पेटले आहे. कुर्डुवाडी येथे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या प्रमुख पदाधिका-यांची बैठक संपन्न होवुन ‘उजनी पाणी बचाव संघर्ष समिती’ची स्थापना करण्यात आली आहे.

पालकमंत्री भरणे यांनी उजनीचं पाणी इंदापुर तालुक्याला नेल्याबद्दल दि.1 मे रोजी सर्व शेतकरी संघटनेतर्फे महाराष्ट्र दिनादिवशी उजनीत जलसमाधी अंदोलन जाहिर केले आहे.

पालकमंत्री यांनी उजनीचं पाणी पळविल्यामुळे महाराष्ट्रदिनी ध्वजारोहन करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भरणेमामांना उरला नाही,असे अतुल खुपसे यांनी सांगितले.

यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर भैय्या देशमुख,शेतकरी नेते अतुलभाऊ खुपसे, DVP उद्योग समुहाचे चेअरमन अभिजित आबा पाटील,माऊलीभाऊ हळणवर,प्रहारचे दत्ताभाऊ व्यवहारे,विठ्ठल मस्के,बळीराम गायकवाड, श्रीकांत नलवडे,किरण भांगे,आण्णासाहेब जाधव,प्रशांत करळे,आप्पासाहेब गवळी, ज्ञानदेव चोपडे मेजर,अॅड.बापूसाहेब मेटकरी,धनाजी गडदे,आप्पासाहेब मेटकरी,आबासाहेब खरे,संदिप खरे,सुधिर गाडेकर, अमोल गायकवाड, आप्पासाहेब गवळी,नानासाहेब मोरे,सर्जेराव गायकवाड इ.उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget