हिंगोली जिल्ह्याचे नाव अत्यंत कमी वयात राष्ट्रीय पातळीवर नेऊन उंचवणारे तरुण तडफदार नेतृत्व राज्यसभेचे खासदार ऍड.राजीवजी सातव यांच्या निधनामुळे हिंगोली जिल्हा आणि महाराष्ट्राचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. वास्तविक पाहता हे त्यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या जाण्यामुळे देशातील, राज्यातील युवकांची आशा उंचवणरा नेता राज्याला गमवावा लागला ही खूपच दुःखद घटना आहे. पंचायत समिती सदस्य ,जिल्हा परिषद सदस्य,आमदार, खासदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवून जनतेची सेवा केली आहे.त्यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो.
जनसामान्यांच्या मनात त्यांनी निर्माण केलेले स्थान सदैव अढळ राहील.खासदार राजीवजी सातव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.