तुम्हाला पुलवामा हल्ला आठवतो का ?
हो तोच तो लोकसभा - 2019 पुर्वी एक स्फोटकांनी भरलेली गाडी CRPF च्या ताफ्यात घुसते आणि बरोबर अशाच बसवर जाऊन आदळते जी बुलेटप्रुफ नसते , आपले मिडिया तील चाणक्य ( ? ) शोध लावतात की त्या गाडीत 350 किलो स्फोटके असतात वगैरे मात्र आजपर्यंत ती गाडी कोणाच्या मालकीची आहे /होती ? , ड्रायव्हर कोण होता ? याबाबत पुढे काय झाले याची कोणालाच माहीती नाही. इतके जवान त्यावेळी मारले गेले तेव्हा पाकिस्तान कडे बोट दाखवून वातावरण तापवले आणि निवडणूका जिंकल्यात.
(पुलवामाच्या वेळी शेट काॕर्बेट नॕशनल पार्क मध्ये फोटोसेशन करत होते हे आपण सर्व जाणताच.)
काल चीनी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात 16 बिहार रेजिमेंट चे तीस पेक्षा जास्त जवान शहिद झालेत. हे सर्व जवान बिहार मधील आहेत यानंतर त्या जवानांचे पार्थिव गावागावात पोहोचवले जातील आणि राष्ट्रभक्तीचा माहौल / फिवर मिडियाच्या माध्यमातून निर्माण केला जाणार त्यायोगे लाॕकडाऊन मधील केंद्र सरकारचे ढिसाळ नियोजन , कोरोना महामारी तील केंद्राचे अक्षम्य दुर्लक्ष तसेच हजार - पंधराशे किलोमीटर ची पायपीट करुन अत्यंत हालअपेष्टा होऊन रक्ताळलेल्या पायांनी खुरडत खुरडत घरी पोहोचलेल्या प्रवासी मजूरांच्या डोक्यात असलेल्या संतापाला डायव्हर्ट करुन देशभक्तीचा डोस देऊन EVM च्या माध्यमातून निवडणूक जिंकण्यासाठी ही सर्व नेपथ्यरचना आहे.
या ठिकाणी लढण्यासाठी कुमाऊँ रेजिमेंट , गढवाल रेजिमेंट , गोरखा रेजिमेंट आणि डोगरा रेजिमेंट या अत्यंत उपयुक्त आहेत कारण यातील जवान अशाच वातावरणात लहानाचे मोठे झालेले असतात आणि ट्रेनिंग सुद्धा डोंगराळ भागात लढण्यासाठी दिलेले असते मात्र काही काळापुर्वी वरील रेजिमेंट ला हटवून 16 बिहार रेजिमेंट ला तेथे जाणीवपूर्वक नेमणूक करण्याचा उद्देशच बिहार निवडणूक डोळ्यासमोर असणे होय .
16 बिहार रेजिमेंट चे जवान डोंगराळ भागात लढण्यासाठी प्रशिक्षित नाहीत हे वास्तव लष्करातील अधिकारी मान्य करतात मग हा सर्व खटाटोप कशासाठी केला गेला तर भाजपेयींना स्वतःची ना - लायकी झाकण्यासाठी जवानांना जीव गमवावे लागलेत यासाठी भाजपेयींचा निषेध करावा तितका कमीच आहे.
या सर्व राजकारणात नाहक जीव गमवावा लागलेल्या माझ्या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांना भावपूर्ण श्रद्धांजली
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.