वृत्तसंस्था // प्रतिनिधी
1:-अनुकंप/सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्या पाल्यास विना अट सेवेत रुजू करून घेणे बाबद
2:- 2018 पोलीस भरती प्रतीक्षा यादीतील सर्वच उमेदवारांना तात्काळ सेवेत रुजू करण्यात यावे
3:-स्वेच्छानिवृत्ती(vrs)देऊन वरसास सेवेत घेण्यात यावे
4:-वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या पाल्यास पोलीस पाल्य म्हणून आरक्षण देण्यात यावे व त्यांच्या एका वरसास अनुकंप तत्वावर घेण्यात यावे
5:- सेवेत असणाऱ्या पोलीस पाल्यास पोलीस पाल्य म्हणून आरक्षण द्यावे
मी राहुल दूबाले 12 मे रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी झालेल्या विडिओ कॉन्फरन्स मध्ये मांडले आहेत
सध्या कोरोनाच्या महामारी मध्ये जोखमीचे काम हे पोलीस खात्याच्या खांद्यावर आहे कित्येक पोलीस अधिकारी कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत व कित्येक शाहिद झाले आहेत त्यांच्यावर येणार ताण व अपुरे मनुष्यबळ लक्षात घेता पोलीस यांच्यावर होणार ताण तोंड दाबून बुक्यांचा मारा सहन करावा लागत आहे महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने वारंवार शासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली आहे. म्हणून शासनाने मागील काही वर्षे पूर्वी आणीबाणी च्या काळात पोलीस पुत्रांना सेवेत सामावून घेतले होते महाराष्ट्रात कित्येक पोलीस पुत्र यांना कायद्याचे ज्ञान आहे म्हणून त्यांना सामावून घेतले तर जास्तीचे मार्गदशन करण्याची अवश्यक्यता नाही तसेच सेवेत असणारे पोलीस यांचे पाल्य,अनुकंपा तत्वावर असणारे पाल्य,रिटायर झालेल्या कर्मचारी यांचे पाल्य,vrs देऊन पाल्यांना संधी व 2018 भरती मधील प्रतीक्षा यादीत असणारे पोलीस पाल्य व इतर युवक सामावून घेतले तर महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण व कायदा सुव्यवस्था राखण्या साठी शासनाला मदत मिळेल व कोरोना मुळे वाढती बेरोजगारी याला आळा बसेल ही गोष्ट कायद्याच्या चॉकटीत राहून योग्य निर्णय घेणे शक्य आहे महाराष्ट्रात 2 लाखाच्या वर पोलीस कर्मचारी आहेत सेवेत याचा शासनाने गंभीर रित्या विचार करून निर्णय घ्यावा अशी विनंती महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून करण्यात येत आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.