वृत्तसंस्था // प्रतिनिधी
राज्यातील रुग्णसंख्या 5 लाख 80 हजार पार झाली. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्र भारतातील कोविड-19 ची नवीन राजधानी बनले आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीसांनी आज ट्विट करत म्हटले की, " महाराष्ट्रात भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 24% लोकसंख्या आहे आणि या आजारामुळे होणाऱ्या देशातील एकूण मृत्यूंपैकी केवळ 41% येथे आहेत." पुढे ते म्हणाले की, "आम्ही कोणतेही आरोप करीत नाही. राजकारण करण्यापेक्षा कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यावर आमचा विश्वास आहे. राज्यात चाचण्यांची संख्या वाढवावी अशी माझी मागणी आहे."
विरोधी पक्ष, नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत सिंहच्या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले की, सद्यःस्थितीत पोलिस दबावात काम करत आहे. ते म्हणाले की, "महाराष्ट्र पोलिस काय आहेत ते मी जाणून आहे. माझ्या पाच वर्षांच्या अनुभवात मी त्यांच्या क्षमतेबद्दल चांगल्या प्रकारे परिचित आहे. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली काम करू नये, असे मला वाटते.
सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्याबाबत फडणवीस म्हणाले की, या प्रकरणाची सीबीआयने चौकशी केली पाहिजे, अशी जनतेची भावना आहे. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.
माजी मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, तिन्ही पक्षांमध्ये आपापसांत वाद-विवाद आहेत. ते म्हणाले की, हे सरकार राज्य योग्य प्रकारे चालवण्यावर लक्ष केंद्रित करायचे सोडून विनाकारण खर्च करत आहेत. कोरोनाव्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी आरटी पीसीआर चाचण्या वाढवण्याचेही फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महामारीच्या काळात अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे आवश्यक नाही. मात्र सरकारने सर्व खात्यांमध्ये 15 टक्के बदल्या करण्यात परवानगी दिली आहे, ज्यामुळे खर्च वाढला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.