सोलापूर जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करा:- बळीराजा शेतकरी संघटनेची मागणी



पंढरपूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे परंतु शासनाने अद्याप पंचनामे करण्याचे आदेश दिले नाहीत बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आज पंचनामे करून नुकसानभरपाई त्वरित मिळावी अशी मागणी केली आहे पंढरपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचंड व मुसळधार पाऊस पडत असून यामुळे अनेक ओढे नाले ना पूर आलेला आहे अनेकांचे शेती साहित्य पिके वाहून गेली आहेत इकडे लाँकडॉन मुळे शेतीमालाला बाजार भाव नाही त्यातच हा प्रचंड पाऊस पडलेला आहे तालुक्यांमध्ये कासेगाव ओझेवाडी खर्डी तावशी उपरी पळशी भागामध्ये ढगफुटी होऊन प्रचंड पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची केळी द्राक्ष टोमॅटो फुलशेती याचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अन्यथा बळीराजा संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचा आंदोलन केले जाईल यावेळी बळीराजाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर, गोपाळ पाटील, तानाजी सोनवणे, औदुंबर सुतार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget