सोलापूर // प्रतिनिधी
शासनाचे सक्त आदेश आहेत की राज्यातील एक ही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहताकामा नये, पण मंगळवेढा तालुक्यातील अरळी येथील आय सी आय सी आय बँकेने तब्बल चार महिने शेतकऱ्यांकडून विविध कागदपत्र घेतली, पण कर्ज कधी मिळणार विचारणा केल्यास नेहमी उडवाउडवीची उत्तरे ,वारंवार तीच उत्तर ऐकून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बँक मॅनेजरला तब्बल दोन तास जाब विचारला व येत्या आठ दिवसात जर पीक कर्ज न दिल्यास बँकेसमोर बेमुदत ठिया आंदोलन करू असा इशारा दिला असता येत्या आठ दिवसांत सर्व शेतकऱ्यांची प्रकरण मार्गी लावू अस आश्वासन दिल्यावर
शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन तूर्त स्थगित केलं.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.