भीमा नदी पात्रात दोन लाख पन्नास हजार क्युसेसने विसर्ग करण्यात येणार? असल्याची शक्यता वर्तवली असून नदीकाठच्या काही भागांमध्ये पाणी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, यामध्ये व्यास नारायण झोपडपट्टी मधील काही भाग तसेच पंढरपूर शहरातील सखल भाग मधील काही भाग व शहरातील सर्व नदीकाठावरील लोकवस्तीतल्या भागात पाणी येण्याची शक्यता असून या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सोलापूर जिल्ह्याबरोबरच सोलापूर जिल्ह्याबरोबरच उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये दोन दिवस झाले मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे या बाबतीत उजनीच्या काही अधिकाऱ्यांनी या दुजोरा दिला आहे तरीही प्रशासनाकडून सर्व पंढरपूर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की सर्व नागरिकांनी जोपर्यंत संपूर्णपणे पाऊस थांबत नाही तोपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.