कार्तिकी एकादशीनिमित्त आज अजित दादा पवार यांची शासकीय महापूजा संपन्न


(संपूर्ण महाराष्ट्राला कोरोनामुक्त कर उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे)

पंढरपूर : जगावर देशावरचे कोरोनाचे संकट आहे, ते संकट दूर होऊ दे. कोरोनाची लवकर लस मिळू दे असे साकडे राज्यातील सर्व जनतेच्या वतीने विठ्ठलाला घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


कोणामुळे लोक डाऊन पडले आहे. त्यामुळे शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याचबरोबर छोटे-छोटे कामगार, हातावरचे पोट असणारे लोक यांनादेखील काम करता येत नाही. यामुळे त्यांचा दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न गंभीर होत आहेत. ही परिस्थिती लवकर बदलू दे. कोरोनाचे संकट दूर होऊ दे.


कोरोनावर नियंत्रणआणण्यासाठी

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बळ मिळू दे, असे साकडे पांडुरंगाकडे घातले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


वेगळे वळण देणाऱ्याला वारकरी संप्रदायाने दिली नाही साथ

वारकर्‍यांची संबंध महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल आहे. त्यामुळे सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची आतुर झालेले असतात. जरी कोरोनाचे संकट असले तरी चर्चेतून चांगल्या पद्धतीचा मार्ग काढण्याचे प्रयत्न करायचा असतो. कोणी याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला तरी वारकरी संप्रदायाने त्याला साथ दिली नसल्याचे पवार यांनी सांगितले.


पंढरपुरातील घाटाच्या कामाची होणार चौकशी


पंढरपुरातील चंद्रभागा नदी जवळील कुंभार घाट आहे. त्याच्या नजीक नव्याने बांधण्यात आलेला घाट ढासळून ६ जणांचा मृत्यू झाला होता. ही गंभीर बाब आहे. अशा पद्धतीचे विकास कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी लावून कारवाई करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget