सर्वसामान्य गोरगरिबांची रेशन कार्ड, विविध योजनांची माहिती, दाखले अशी तहसील मधली कामे केली जात नव्हती पूरग्रस्त अनुदान अवकाळी अनुदान यामध्ये अनेक तक्रारी होत्या शेतकऱ्यांच्या मुलांचे दाखलेही लवकर मिळत नव्हते तहसीलदार कोणाचाही फोन उचलत नव्हत्या अवैध वाळू वाहतूक जोरात चालू होती अनेक वेळा अनेक संघटनांनी तक्रारी केल्या होत्या बळीराजा शेतकरी संघटनेने थेट मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देऊन बदली करा अशी मागणी केली होती बळीराजा संघटनेने अनेक वेळा पालक मंत्री जिल्हाधिकारी प्रांत अधिकारी यांच्याकडे बदलीची मागणी केली होती या मागणीची दखल घेत महाराष्ट्र सरकारने आज तातडीने बदली आदेश दिला त्याबद्दल महाराष्ट्र सरकारच अभिनंदन केलं व श्री विठ्ठला च्या समोर नामदेव पायरी जवळ पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला
यावेळी बळीराजाचे माऊली हळणवर, सुमित शिंदे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम बाबा चव्हाण अण्णा सलगर वैभव भूमकर संतोष बंडगर विजू माळी नरसप्पा वाघमोडे अमोल कोळी यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.