पालकमंत्री ना.अमित देशमुख यांच्याकडून लातूर शहरातील आगीच्या घटनेबाबत चौकशी

 




 सतत संपर्कात राहून घेतली माहिती जीवित हानी टाळून आग नियंत्रणात आणल्याबद्दल अग्निशमन प्रशासन व पोलीस यंत्रणेचे केले कौतुक 


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

लातूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई परिसरातील अग्रवाल यांच्या गोयल ट्रेडर्स च्या  इमारतीत आग लागल्याची माहिती मिळतात लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी तात्काळ जिल्हाधिकारी  पृथ्वीराज बीपी यांच्याशी संपर्क साधून सदरी आग नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर संपूर्ण आग आटोक्यात येईपर्यंत ते संबंधित यंत्रणांच्या संपर्कात होते.


शुक्रवारी सायंकाळी गंजगोलाई परिसरात राजकमल इंद्रजीत अग्रवाल यांच्या मालकीच्या गोयल ट्रेडर्स या ऑइल पेंटचे दुकान आणि गोडाऊनला असलेल्या इमारतीला आग लागली, यासंदर्भातील माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना . अमित विलासराव देशमुख यांना समजताच त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी यांच्याशी संपर्क साधला सदरील आग नियंत्रणात आणण्यासाठी  आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.


गंजगोलाई ही लातूरची मुख्य बाजारपेठ आहे, या ठिकाणी दाटीवाटीने अनेक प्रकारची दुकाने, शोरूम व्यापारी प्रतिष्ठाने आहेत,  आग इतरत्र पसरली  तर मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती आग पसरणार नाही याची दक्षता घ्यावी, गरज पडल्यास शेजारची शहरे व जिल्ह्यातून अग्निशमन दलाची मदत घ्यावी अशा सूचना पालकमंत्री ना देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज महापालिका आयुक्त अमन मित्तल आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्याशी चर्चेदरम्यान  दिल्या .

सदरील आग आटोक्यात येईपर्यंत पालकमंत्री ना. देशमुख सातत्याने संबंधित यंत्रणेच्या संपर्कात होते. सदरील आग  एका इमारतीतून दुसऱ्या इमारतीत पोहोचली परंतु त्यानंतर ती पुढे पसरली नाही. गोडाऊन मधील मालाचे नुकसान झाले असले तरी मनुष्यहनी झाली नाही याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करून अग्निशमन दलाचे जवान तसेच त्यांना मदत  करणारे प्रशासन, पोलिस आणि जनतेचे त्यानि कौतुक केले आहे, या आगीत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देशिही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. 


मुख्य बाजारपेठेतील  ही आग कशी लागली याची चौकशी करावी जेणेकरून पुन्हा अशा घटना घडणार नाहीत याची दक्षता घेता येईल असे त्यांनी म्हटले. काही दिवसापूर्वी भंडारा आणि आत्ता लातूर येथे आगीच्या घटना घडल्याचे दिसून येते आहे त्यामुळे लातूर जिल्हा आणि शहराच्या हद्दीतील शासकीय-निमशासकीय इमारती त्याचबरोबर शहरातील इतर महत्त्वाच्या इमारती चे फायर सेफ्टी ऑडिट करून घ्यावे जेणेकरून अशा दुर्घटना पुन्हा घडणार नाहीत अशा सूचनाही पालकमंत्री ना देशमुख यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बीपी आयुक्त अमन मित्तल आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे यांना दिल्या आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget