करमाळा प्रतिनिधी :- (विजय निकत )उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काच्या पाण्याच्या एकाही थेंबालाही धक्का लागणार नाही, उजनीतून इंदापूर तालुक्यातील गावांसाठी पाणी नेण्याचा 22 एप्रिल चा तो आदेश रद्द केला असल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे सोलापूर येथील एकीचा विजय असल्याच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. यावेळी आ.संजयमामा शिंदे आ.यशवंत माने मा आमदार दिपक साळुंखे पाटील राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर उमेश पाटील कल्याणराव काळे व सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते
चौकट :-
प्रत्यक्षात जी.आर निघाल्याशिवाय काही खरे वाटत नाही
वरकरणी पहाता महाविकस आघाडीचे सरकार जन रेट्याला सरकार घाबरल असून पेडगाव च्या बंधारा वरील व्हीडीओ व्हायरल झाल्यापासून सरकार बॅक फूट वर गेलय जनतेच्या क्षोभाला ,रागाला किंमत द्यायच्या ऐवजी कुणाची तरी नाव घेऊन यांनी सांगितले म्हणून आम्ही आदेश मागे घेतोय हे सांगायचं म्हणजे आतापर्यंत मूक संमती दिलेल्या तथाकथित पुढाऱ्याना,नेत्यांना जिवदान द्यायच हे राजकारण आहे यापुढे ही आमचा संघर्ष चालूच राहणार आहे
.प्रा.शिवाजीराव बंडगर अध्यक्ष :-
उजनी धरण संघर्ष समिती

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.