आषाढी वारीच्या पार्श्वभूमी पंढरपुरातील ४५० मठाअधिपतींना नोटीसा



पंढरपूर नगरपरिषद अलर्ट परराज्यातून आलेल्या वारक-यांना सहारा दिल्यास होणार कायदेशीर कारवाई


पंढरपूर // प्रतिनिधी

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध नियंत्रणासाठी आषाढी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत शहरातील व ग्रामीण भागातील ४५० मठाधिपतींना नोटीसा काढल्यास याची माहिती उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली आहे.

आषाढी यात्रा सोहळा एक महिन्यांवर आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहर व हद्द भागामध्ये असलेल्या सर्व लहान मोठे मठ, वारक-यांना भाडेतत्वावर देण्यात येणा-या खाजगी इमारती यांचा सर्वेक्षण केले आहे. सध्यास्थितीत त्या ठिकाणी वास्तव्यास असणारे नागरिक व साधकांची नावे संकलित करण्यात आली आहेत.

सर्व लहान मोठे माठांचे व्यवस्थापक, वारक-यांना भाडेतत्वावर देण्यात येणा-या इमारतींच्या मालकांना नोटीस देण्यात आली आहे. राज्यातील व जिल्ह्यातील, परराज्यातून येणा?्या नागरिक साधकांना पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या पूर्व परवानगी शिवाय वास्तव्यास ठेवता येणार नाही. पूर्व परवानगीशिवाय नागरिक व साधकांना वास्तव्यास ठेवल्याचे निदर्शनास आल्यास आपल्यावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे पत्र उप मुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांनी दिली.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget