शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण:- प्रकाश वाले



मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा

सोलापूर // प्रतिनिधी 

केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकरी, व्यापाऱ्यांवर लादला तो अन्यायपूर्वक निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर समोर येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, कांदा निर्यात बंदी निर्णय रद्द करा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अश्या घोषणाने परिसर दणाणुन गेला.


यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, देशात महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना सुद्धा मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले कांद्याला आत्ता कुठे भाव चांगला येऊ लागल्याचे दिसत होते चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानकपणे निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यावर घोर अन्याय केला आहे तीन महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळीना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती आणि तीन महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. मोदी सरकारच्या या लहरी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या मध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलत आहेत. तसेच कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी पाठविलेले शेकडो कांदयाचे कंटेनर मुंबई पोर्टवर उभे आहेत कांदा नाशवंत असल्यामुळे व्यापारयांचेही नुकसान होणार आहे म्हणून मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणी साठी आज रोजी हे आंदोलन करण्यात आला. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.


यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, केदार ऊंबरजे, रेवनसिद्ध आवजे, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष हरीष पाटील, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष गौरव खरात, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ND जावळे, दिनेश उपासे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, बसवराज बगले, सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश सेवादल चे अशोक कलशेट्टी, माजी नगरसेवक जेम्स जंगम हारून शेख, आझम सैफन, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, माणिकसिंग मैनावाले, अख्तर मनियार, अरुण साठे, विवेक कन्ना, योगेश मार्गम, सैफन शेख, नागनाथ कदम, संभाजी भोसले, अशोक देवकते, योगेश दुलंगे, उमेश यादवाड, हसीब नदाफ, नूर अहमद नालवार, सायमन गट्टू, मुन्ना बिराजदार, दत्तात्रेय नामकर, चक्रपाणी गज्जम, अनिल मस्के, सतीश संगा, संतोष अट्टेलुर, श्रीकांत दासरी, किसन मेकाले गुरुजी, शोभा बोबे, रंजना इरकर, मुस्कान शेख, सोमनाथ व्हटकर, रेवन चव्हाण, शिवराज कोरे, प्रमिला तूपलवंडे, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, अनिता भालेराव, मीणा गायकवाड़, अरुणा बेंजरपे, शोहेब कडेचुर, नरेश महेश्वरम, राकेश मंतेन, आनंद मैले, लालू सानी, रवि हुन्डेकरी, यांच्यासह इतर पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget