पंढरपूर // प्रतिनिधी
देशावर ओढावलेले कोरोनाचे संकट आणि तेवढ्यात केंद्र सरकारचे निर्णय काय म्हणावे ह्या सरकारला लॉकडाऊन गोरगरीब,कष्टकरी, शेतमजूर अडचणीत सापडलेला आहे. तरी असे असताना शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झालेली आहे.शेतात खपून मोठ्या कष्टाने शेतकऱ्याने कांद्याचे उत्पादन घेतले.कांद्यालाही आता कुठे चांगला भाव येवू लागल्याचे दिसत होते.
चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्याला होती.पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदानिर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. ही कांदानिर्यात बंदी तात्काळ मागे घ्यावी.अशी मागणी केंद्र सरकारच्या या शेतकरीवर्गाच्या अन्यायी निर्णयाविरोधात शिवस्वराज्य युवा संघटना रस्त्यावर उतरले.गेल्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजे ४ जून २०२० रोजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा,बटाटा,दाळींना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करुन स्वतःची पाठ थोपटवून घेतली होती. मग तीन महिन्यात निर्णय का फिरवला त्यांनी घेतलेल्या निर्णयाची ते व्यवस्थित अंमलबजावणी करु शकत नाहीत केंद्र सरकारला धोरण लकवा झालेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या वल्गना करतात आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत असे नुकसान करणारे निर्णय घेतात यातून शेतकरी कसा आत्मनिर्भर होणार आहे.शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणार,शेतमालाला दीडपट हमी भाव देणार,शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करणार या केंद्र सरकारच्या फक्त वल्गनाच आहेत,

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.