महिला बचतगट कर्ज माफीसाठी मनसेचा राज्यभरातून उद्रेक



अहमदनगर जिल्ह्यातूनही मिळाला मोठा प्रतिसाद


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

सध्या मनसेने महिलांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्याचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून विविध जिल्ह्यामध्ये महिला मोर्चे काढण्यास सुरुवात केली आहे. या मोर्चामध्ये मोठा उद्रेक दिसून येत असून वरील मागणी साठी मोठी गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातूनही या मोर्चासाठी मोठी गर्दी होऊन जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले.

या निवेदनात महाराष्टातील लाखो माता  भगिनींनी महिला बचत गटाच्या माध्यमातून मायक्रो फायनान्स कंपनीकडून व्यवसाय साठी कर्ज घेतली आहेत, गेली 10ते 15 वर्ष झाले हे कर्ज घेत असून ते नियमित पणे परत फेड करत आले आहेत,,


हे कर्ज घेत असताना मायक्रो फायनान्स कंपनी प्रत्येक महिलेकडून दिलेल्या कर्जाची सुरक्षा म्हणून दर वर्षी विमा पॉलिसी च्या नावाखाली हजारो रुपये घेतात, परंतु विम्याचे सर्टिफिकेट देत नाहीत,,

साहेब,कोरोनाच्या या संकटामुळे सर्व उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत, कोणाच्याही हाताला काम नाही,उपासमारीची वेळ आली आहे, न्हवे तर भूक बळी जात आहेत, अनेक लोक आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करत आहेत,, साहेब, महाराष्ट्रातील लाखो महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसाय च बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत,, अनेक महिलांनी कर्ज घेऊन लोणचे, शेवया, पापड, यासारखे पदार्थ तयार केले होते, परंतु लॉक डाऊन  मुळे तो माल विकला गेला नाही आणि 6 महिन्यात तो माल पूर्णपणे खराब झाला त्यामुळे त्या महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे,, 

मायक्रो फायनान्स चे कर्मचारी रोजच त्या महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी  तगादा लावत आहेत, धमकी देत आहेत, घरातील साहित्य उचलून नेत आहेत, पैसे द्या नाही तर तुमचा टी व्ही ,फ्रिज, गॅस, भांडी घेऊन जातो अशी धमकी देत आहेत, महिलांना अश्लील बोलणे, शिविगाळ करणे, त्यांच्या घरात बसून राहणे, शरीर सुखाची मागणी करणे, असे मायक्रो फायनान्स चे गुंड करत आहेत,,

साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील बचत गटाच्या महिलांना असा त्रास दिला जात आहे,, वास्तविक कोरोनाच्या नैसर्गिक संकटामुळे महिलांचा व्यवसाय अडचणीत आला त्यांचे भांडवल बुडाले ,जर व्यवसाय अडचणीत आला बुडाला तर विमा कवच आहे परंतु विम्याचे पैसे घेऊन देखील विमा देत नाहीत, जर विमा मिळाला तर या सर्व महिलांना दिलासा मिळेल,, मायक्रो फायनान्स कंपनीकडे वारंवार विमा सर्टिफिकेट ची मागणी करून देखील ते विमा सर्टिफिकेट देत नाहीत याचा अर्थ त्यांनी पैसे घेऊन देखील ते विमा कंपनी कडे भरले नाहीत,, म्हणजे लाखो कोटी रुपयांचा घोटाळा या सर्व मायक्रो फायनान्स कंपन्यांनी केला आहे,याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,,

साहेब सरकारने मोठमोठ्या उद्योग पतींना कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ केली आहेत,, महिला बचत गटाची तर खूप छोटे कर्ज आहे ते संपूर्ण माफ होण्यासाठी आपण प्रयत्न करावेत ही नम्र विनंती,, साहेब महिला खूप अडचणीत आहेत ,कसलेही काम नाही ,त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींना देखील काम नाही प्रचंड हलाखीचे जीवन जगत आहेत ,,आणि वरून रोजच मायक्रो फायनान्स गुंडांचा त्रास यामुळे अनेक महिला निराशेचे जीवन जगत आहेत अशातच पंढरपूर येथील मनीषा निकम या महिलेने या गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे,तसेच बुलढाणा जिल्ह्यातील एका महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे, आशा अनेक महिला आत्महत्या करत आहेत , 'तरी कृपया आपण  महिलांना होणारा त्रास थांबवण्यासाठी आदेश द्यावेत आणि महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणीही करण्यात आली.


 यावेळी दिलीपबापू धोत्रे,,

प्रदेश सरचिटणीस

अनिल चितळे

सरचिटणीस, सहकार सेना

सचिन डफल,, जिल्हा अध्यक्ष

अहमदनगर.आदींसह मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि महिला बचतगट मधील महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget