सोलापूर // प्रतिनिधी
सध्या सोलापुरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा तांडव सुरु आहे . त्यामुळे वाढता कोरोना प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन सोलापूरातील कामगार , नागरीक बंधु - भगिनींनी रंगपंचमी अत्यंत साधा पध्दतीने साजरा करावे असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी सोलापूर वासीयांना केले .
महाराष्ट्रासह सोलापूरात गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे पहिल्या टण्यातील कोरोना लाटेत सोलापुरातील सर्व नागरिकांनी शासनाचे अहवानानुसार नियम पाळुन कोरोना पळविण्यात यशस्वी झालो . पण सध्या चालु असलेला दुसऱ्या टप्यात कोरोना लाटेचा गांर्भिय लोकांमध्ये दिसुन येत नाही . आणि नियम पाळण्याचे यशस्वी प्रयत्न होताना दिसुन येत नाही . यामुळेच कोरोना थांबता थांबेना.
रंगपंचमी हे उत्सव राष्ट्रीय व धार्मिक उत्सव असुन रंगपंचमी दिवशी आपले एकमेकाचे हेवे - दावे बाजुला ठेवुन विविध रंग उधळुन , शुभेच्छा देऊन स्नेह प्रेम वाढवावे . असा या उत्सवाचा मतितार्थ आहे परंतु असे सांस्कृतिक विचार न ठेवता . इच्छा नसणाऱ्या वर रंग टाकणे , कोंबडीचे अंडे डोक्यावर फोडणे , कोंबडीचे अंडे फेकुन मारणे , कपडे फाडाफाडी करणे असे अप्रिय प्रकार काही अति उत्साही युवक - युवती करताना दिसुन येतात . म्हणून रंगाचा बेरंग होऊन जातो . म्हणून सर्व नागरिक बंधु भगिनींना विनंती आहे की , ' सुसंस्कृत रंग खेळुया - कोरोना पळवुया ' कोरोना पळवुया असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.