आंब्याला ‘डाग’ केमिकलचा

 



काही व्यापाऱ्यांकडून आंबा रासायनिक पद्धतीने पिकविला जात आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आहे.  


वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

फळांचा राजा आंब्याची चव चाखण्यासाठी खवय्ये तयार आहेत. मात्र, काही व्यापाऱ्यांकडून आंबा रासायनिक पद्धतीने पिकविला जात आहे. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारावर कारवाई करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभाग मूग गिळून गप्प आहे.

आंबा पिकविण्यासाठी विक्रेत्यांकडून रासायनिक पदार्थाचा (कॅल्शियम काबाईड) उपयोग केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सध्या वाई बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे आंबे विक्रीसाठी आले आहेत. आंब्याची चव घ्यायची, एवढीच माहिती ग्राहकांना आहे. नेमका आंबा कोणत्या प्रकारचा आहे, हे ग्राहकांना ओळखत नाही. बाजारात वाई बाजार मध्ये, हापूस, देवगड हापूस, केशर, बेगमपल्ली अशी आंब्याची नावे घेऊन व्यापाऱ्यांकडून विक्री सुरू आहे. सुमारे ४०० रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंत आंब्याच्या पेटीचे दर आहेत. ग्राहकांना कमी किमतीत आंबा देण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी शक्कल लढविली आहे. कच्चा माल स्वस्तात आणून त्यात रासायनिक औषधांचा वापर केला जातो. हा आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. या रासायानिक पदार्थाचा उपयोग केलेली फळे आरोग्यास अपायकारक ठरत आहेत. बाजारपेठ माहूर ,वाई बाजार. आंध्रप्रदेश, कर्नाटक भागातून आंबा मोठ्याप्रमाणात विक्रीला आला आहे. साधारणात रोज ५ ते ६ ट्रक माल येतो. बाजारात हापूस आंबा मोठ्या प्रमाणात विक्रीला आला आहे. या प्रकाराकडे अन्न व औषधी प्रशासन विभाग आणि आरोग्य विभागाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

फळाविषयी जागरूक राहा

रासायानिक पदार्थांचा वापर करून विक्री केलेली फळे शरीराला घातक आहेत. त्याचा परिणाम पोटाच्या आतड्यावर आणि किडनीवर होत असतो. मुळात फळांमध्ये जी जीवनसत्त्वे असतात ती रासायनिक पदार्थामुळे नष्ट होऊन जातात. त्यामुळे अशा फळांमधून जीवनसत्त्वे काहीच मिळत नाहीत. उलट शरीरावर त्याचा परिणाम होत असतो. विशेषत: लहान मुलांच्या किडनी आणि आतड्यावर त्याचा जास्त परिणाम होतो. वेगवेगळी फळे रायानिक औषधांमध्ये साठवून ठेवली जातात. ती पाण्यात टाकल्यानंतर फॉस्फरिक अॅसिड वायू तयार होतो. त्यामुळे हाडे ठिसूळ होत असल्याने पालकांनी फळांविषयी जागृत राहावे, 

‘फळे पिकविण्यासाठी रासायनिक औषधांचा उपयोग केला जातो. तो लहान मुलांसाठी अतिशय घातक आहे. या रासायनिक औषधांपासून अॅसिटीलीन नावाचा वायू तयार होत असून त्याचा परिणाम मेंदूवर होत असतो. लवकर पिकवलेली फळे खाल्ली तर ताप येणे, मळमळ करणे, उलट्या, जुलाब यांचा त्रास होतो.’

‘नैसर्गिक आंबा पिकविण्यासाठी २० ते २१ दिवसांचा अवधी लागतो. आंबा लवकर पिकविण्यासाठी व्यापारी कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून आंबे पिकवितात. या तंत्रामुळे आंब्याचा केवळ रंग बदलतो. हिरवा आंबा पिवळा होतो. मात्र, त्याची चव बदलत नाही. या प्रकारावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून कारवाई अपेक्षित आहे.’

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget